रत्नागिरीच्या मत्स्योत्पादनात ३ हजार ४०० मेट्रिक टनाची वाढ   

रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाच्या धोरणात्मक निर्णयामूळे रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्योत्पादनात यंदा ३ हजार ३९६ मेट्रिक टनाची वाढ झाल्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी सांगितले.पत्रकार परिषदेत बोलताना तावडे म्हणाले, अवैध मासेमारीवरील कडक कारवाई आणि दिवस-रात्र घालण्यात आलेल्या गस्तीमुळे यावर्षीच्या मत्स्य उत्पादनात वाढ झाली आहे. २०२३-२४ मध्ये जिल्ह्याचे सागरी मत्स्योत्पान ६७ हजार ९०७ मेट्रिक टन इतके होते. २०२४-२५ मध्ये ते ३ हजार ३९६ मेट्रिक टनाने वाढून आता ७१ हजार ३०३ मेट्रिक टन एवढे झाले  आहे.  
    
ड्रोन यंत्रप्रणालीव्दारे अनधिकृत मासेमारी नौकांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येत असून आज अखेर एकूण ३६७ अनधिकृत मासेमारी नौकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ८२ नौकांवरील गुन्हे निकाली काढण्यात आले असून, या नौकांवर ३१ लाख १९ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. २९ एल. ई. डी. नौकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी १८ गुन्हे निकाली काढण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ९० लाख ४० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील मंजूर प्रकल्पांमधून अपेक्षित २०० ते २५० मेट्रिक टन एवढे मत्स्योत्पादन अपेक्षित आहे. जिल्ह्यामध्ये ५० नोंदणीकृत निमखार्‍या पाण्यातील कोळंबी प्रकल्प असून, त्यामधून ३२७ मे. टन एवढे उत्पादन मिळाले आहे.

Related Articles